Ad will apear here
Next
‘२०१९मध्येही भाजपच्याच नेतृत्वाखाली केंद्रात सत्ता’
मुंबई : ‘गेल्या चार वर्षांत देशातील सर्वात गरीब आणि सर्वसामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने काम केल्याने २०१९मध्ये पुन्हा एकदा भाजपच्याच नेतृत्वाखाली केंद्रात सत्ता स्थापन होईल,’ असा विश्वास केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केला; सर्वसामान्यांसाठी काम करतानाच संविधानाचाही मान राखणाऱ्या मोदी सरकारला चार वर्षे पूर्ण झाल्याबद्दल त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे जाहीर अभिनंदनही केले.

आठवले म्हणाले, ‘सबका साथ, सबका का विकास, असा नारा देत सत्तेवर आलेल्या मोदी सरकारने चार वर्षे पूर्ण केली असून, या चार वर्षांच्या कालावधीत केलेल्या कामगिरीची उजळणी करत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सरकारच्या कामगिरीची प्रशंसा केली आहे. गेली चार वर्षे फक्त सर्वसामान्यांच्या हिताचा विचार केल्याने २०१९ मध्येही मोदी सरकारला पर्याय नाही.’

‘पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखालील या सरकारने जीएसटी कर प्रणाली देशात पहिल्यांदाच लागू करत कररचनेत अमुलाग्र बदल घडवून आणला आहे. देशात सध्या तब्बल साडेसहा लाख कोटींची रस्त्याची कामे सुरू आहेत. महिलांना विनातारण कर्ज देण्याची योजना मोदींनी सुरू केली. या शिवाय काळा पैसा बाहेर काढण्यासाठी नोटबंदीचा धाडसी निर्णयही या सरकारने घेतला. अनेक बोगस कंपन्या बंद केल्याच, शिवाय सर्वात महत्त्वाचे म्हणजे मोदींचे सरकार आल्यापासून भ्रष्टाचाराची एकही मोठी घटना घडली नाही. त्यामुळेच गोरगरिबांच्या विकासासाठी नरेंद्र मोदी सरकारला पर्याय नाही,’ असे त्यांनी नमूद केले.

‘या सरकारने ग्रामीण विद्युतीकरण योजना यशस्वीपणे राबवत संपूर्ण देशातील एकही गाव वीजपुरवठ्यापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेतली आहे. शिवाय सौभाग्य अनुदानित एलपीजी योजना आणि गरिबांसाठी उज्ज्वला गॅस कनेक्शन योजनाही प्रभावीपणे राबविली,’ असे त्यांनी सांगितले. प्रधानमंत्री आवास योजना, जन औषधी योजना, ग्रामीण सडक योजना, जलद पासपोर्टसेवा आणि नवसंकल्पित उद्योगांना चालना देण्यासाठीच्या स्टार्ट अप योजनेचेही त्यांनी कौतुक केले.

या शिवाय महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला जगातील सर्वश्रेष्ठ संविधान दिले आहे. या संविधानाबद्दल तसेच संविधानकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबाबत या सरकारच्या मनात आदर असल्याचे सांगत आठवले म्हणाले की, ‘संविधानाच्या गौरवासाठी या सरकारने संसदेचे दोन दिवसीय स्वतंत्र अधिवेशन घेतले; तसेच २६ नोव्हेंबर हा संविधान दिन म्हणून देशभर साजरा करणारे प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचे सरकार आहे. त्यामुळे मोदी सरकारकडून संविधानाला कोणताच धोका नसून केवळ राजकारणासाठी विरोधक संविधानाला धोका असल्याचा खोडसाळ आरोप करत आहेत. तसेच इंदू मील येथील महामानव डॉ. आंबेडकर यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक, नवी दिल्लीतील २६, अलीपूर रोड येथील स्मारक आणि लंडन येथील स्मारकाच्या कामालाही या सरकारने गती दिली आहे.’

पालघर पोटनिवडणुकीतील भाजपच्या प्रचारात सहभागी होत आठवले यांनी काही जाहीर सभा घेतल्या. या सभेदरम्यानही त्यांनी भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्रातील, तसेच राज्यातील सरकारचे कौतुक केले. सर्वसामान्यांसाठी काम करणाऱ्या सरकारचे हात बळकट करण्यासाठी पालघरमधील विजय गरजेचा असून, मतदानाच्या दिवशी फक्त भाजपचे उमेदवार राजेंद्र गावित यांनाच मतदान करा’, असे आवाहनही आठवले यांनी या वेळी केले.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/NZLXBO
Similar Posts
‘मोदी सरकारच्या कामामुळे व नेतृत्वामुळे भाजपचा विजय’ मुंबई : ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने गेल्या पाच वर्षांत केलेले काम जनतेसमोर होते. या कामामुळे व मोदींच्या नेतृत्वामुळे भारतीय जनता पक्षाला लोकसभा निवडणुकीत जबरदस्त विजय मिळाला,’ असे प्रतिपादन भाजप प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब पाटील दानवे यांनी २३ मे रोजी केले. निवडणुकीत आशिर्वाद दिल्याबद्दल
‘सवर्णांना आरक्षण देणारा केंद्र सरकारचा निर्णय क्रांतिकारक’ मुंबई : ‘दलित, आदिवासी, ओबीसी यांच्या आरक्षणाला धक्का न लावता आर्थिकदृष्ट्या मागास सवर्णांना (ईबीसी) स्वतंत्र प्रवर्ग करून १० टक्के आरक्षण देणारा केंद्र सरकारचा निर्णय क्रांतिकारक ठरणारा आहे,’ अशा शब्दांत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी या निर्णयाचे स्वागत केले
‘मोदी सरकारच्या कामांमुळे देशाचा आर्थिक पाया मजबूत’ मुंबई : ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या पाच वर्षांत देशाच्या अर्थव्यवस्थेचा पाया मजबूत करण्यात आला असून, त्याच्या आधारे भारत देश हा विकसित देश होण्याची आणि महाशक्ती बनण्याची आकांक्षा आपण ठेऊ शकतो,’ असे प्रतिपादन रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी केले.
‘देशाच्या सर्वांगीण विकासाबाबत अशक्य ते शक्य झाले’ मुंबई : ‘गेल्या पाच वर्षांच्या भारतीय जनता पक्ष (भाजप) सरकारच्या कार्यकाळात देशाच्या सर्वांगीण विकासाबाबत अशक्य ते शक्य झाले आहे’, असे उद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढले. २८ फेब्रुवारी २०१९ रोजी दुपारी १२.३० ते दोन या दीड तासाच्या वेळेत संपूर्ण देशभरातील एक कोटीहून अधिक ‘भाजप’ हितचिंतक व कार्यकर्त्यांशी

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language